चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच विरूर भागातील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात ३५ प्रवाशांनी भरलेली बस अडकली. यावेळी विरूर स्थानकातील पोलिसांच्या पथकाने जीव धोक्यात घालून या ३५ जणांची बसमधून सुटका केली.